अटीतटीच्या सामन्यात भारताचा विंडीजवर ३ धावांनी विजयः १-० ने आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे आयोजित क्वीन्स पार्क ओव्हलवरील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा तीन धावांनी पराभव केला. हा सामना २३ जुलै रोजी मध्यरात्री पार पडला.
अत्यंत रोमांचक धावांच्या पाठलागात शेवटच्या ओव्हरमध्ये १५ धावा शिल्लक असताना भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने विंडीजचा धुव्वा उडवून भारताला मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली.
सुरूवातीला वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार शिखर धवन (९७), शुभमन गिल (६४) आणि श्रेयस अय्यर (५४) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे ५० ओव्हर्समध्ये ३०८/७ पर्यंत पोहोचता आले.
नियमित कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत धवन आणि गिल यांनी पाहुण्या संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची तडाखेबाज भागीदारी केली. दुर्दैवाने १८ व्या ओव्हरमध्ये गिल रन आऊट झाला आणि त्याला ५३ चेंडूंमध्ये ६४ धावांवर समाधान मानावे लागले.
त्यानंतर श्रेयस अय्यस धवनसोबत क्रीझवर आला. या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजवर प्रचंड दबाव निर्माण केला. दरम्यान धवन ९० धावांपलीकडे गेल्यानंतर तो आपल्या ओडीआय करियरमधल्या सहाव्या वेळी बाद झाला. त्याचे ५० ओव्हर्समधील खेळातील शतक फक्त तीन धावांनी हुकले.
भारत ३५० धावांपलीकडे जाऊ शकेल असे दिसत असतानाच पाहुण्या संघाचे अय्यर (५४), सूर्यकुमार यादव (१३) आणि विकेट कीपर फलंदाज संजू सॅम्सन (१२) एकामागून एक पटापट बाद झाले.
तडफदार फलंदाज दीपक हूडा (२७) आणि ऑल राऊंडर अक्झर पटेल (२१) यांनी डेथ ओव्हर्समध्ये मौल्यवान धावा करून भारताला धावफलकावर ३०० धावा पार करण्यास मदत केली.
बॅटिंगसाठी चांगल्या पिचवर ३०९ धावांचा पाठललाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला सुरूवातीलाच फटका बसला. ओपनर शाय होप (७) हा पाचव्या ओव्हरमध्ये सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर वेस्ट इंडिजचे कायले मेयर्स आणि शमर ब्रूक्सस यांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावा केल्या आणि यजमान संघाला विजयाची आशा मिळवून दिली.
याच दरम्यान मेयर्सने मेयर्सने फक्त ४२ चेंडूंमध्ये आपले पहिले ओडीआय अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल ठाकूरने ब्रुक्सला (४६) आणि मेयर्सला (७५) धावांमध्ये एकमागून एक ओव्हरमध्ये बाद केले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने ब्रँडन किंगसोबत भागीदारी करून ५६ चेंडूंवर ५१ धावा केल्या आणि यजमान संघाला खेळात कायम ठेवले.
त्यानंतर सिराजने भारताला पूरनची महत्त्वाची विकेट २५ धावांवर मिळवून दिली तर लेग स्पिनर युजवेंद्र चहलने रोवमन पॉवेलला (६) अगदी पुढच्याच ओव्हरमध्ये बाद केले.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत वर्चस्व गाजवत असताना किंगने अकील हुसेनसोबत ५६ धावांची भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजची आशा बांधून ठेवली. त्यानंतर चहलने किंग्सला ५४ धावांवर बाद केले.
हुसेन (३२ नाबाद) आणि रोमारिओ शेफर्ड (३९ नाबाद) यांनी शेवटच्या काही ओव्हर्समध्ये सातव्या विकेट्ससाठी फक्त ३३ चेंडूंवर ५३ धावांची लूट केली. परंतु यजमान संघाला फक्त तीन धावांनी हार पत्करावी लागली.
भारत आणि वेस्ट इंडिज रविवार दिनांक २४ जुलै रोजी क्वीन्स पार्कवर दुसऱ्या एक दिवसीय सामन्यासाठी एकत्र येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.