INDvSA, पहिला कसोटी सामना: कमी धावांच्या रोमांचक सामन्यात पराभवाचा धक्का:(

भारत लढला, प्रयत्नांची शर्थ केली आणि सलग दोन दिवस स्पर्धेत टिकून राहिला. दोन्ही संघांनी अशा पिचवर जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला जिने प्रत्येक गोलंदाजासाठी काही ना काहीतरी दिले. पहिल्या दिवशी बुमराहच्या मास्टरक्लासपासून ते दुसऱ्या दिवशी १५ विकेट्सच्या धमाल कामगिरीपर्यंत हा कसोटी सामना प्रत्येक सत्रात मागेपुढे होत राहिला. कोणत्याही टीमला फार वेळ संधी मिळालीच नाही.   

हा लढा तिसऱ्या दिवशी भारताने आपल्या ताब्यात घेतला असे वाटत असतानाच यशाने हुलकावणी दिली. अत्यंत कठीण सकाळ, कठीण पाठलाग आणि अचूक कामगिरीची मागणी करणारी पिच या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दिवस १| आनंदाच्या शहरात जॉयस सुरूवात

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामी फलंदाज एडेन मार्क्रम आणि रायन रिकल्टन यांनी ५७ धावांची भागीदारी केली. त्यांनी काही चौकारही मारले.

त्यानंतर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवले. बुमराह आणि सिराज यांनी रिव्हर्स स्विंगचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांना अक्षर आणि कुलदीप यांनी चांगली मदत केली. त्यांनी फलंदाजांना प्रचंड त्रास देऊन आपला मार्ग सोपा केला.

मात्र हा दिवस जसप्रीत बुमराहच्या नावावर झाला. आपल्या या राष्ट्रीय खजिन्याने प्रोटीआजची फलंदाजी खिळखिळी करताना ५/२७ ची कामगिरी केली.

दिवस २| दोन्ही टीम्सच्या गोलंदाजांची मज्जा

दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स पडल्या आणि फलंदाजांसाठी हे दुःस्वप्न ठरले.

यजमान संघाने आपल्या रात्रीच्या धावसंख्येत १५२ धावांची भर घातली. केएल राहुलने ३९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर सायमन हार्मर उत्तम गोलंदाज ठरला. त्याने ४/३० अशी कामगिरी केली.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ ३० धावांनी पिछाडीवर होता. परंतु त्यांनी ९३/७ पर्यंत मजल मारली. जडेजाच्या उत्तम फॉर्ममुळे त्याला स्टंप्सपर्यंत ४/२९ पर्यंत पोहोचता आले.

दिवस ३| अत्यंत कठीण दिवस

दक्षिण आफ्रिकेचा दिवस ६३ धावांच्या आघाडीने सुरू झाला आणि तीन विकेट्स त्यांच्या हातात होत्या. बॉश आणि बावुमा यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला. या जोडगोळीने रात्रीच्या धावसंख्येत ४२ धावांची भर घातली. त्यानंतर बूमने आणखी एकदा जादू करून बॉशला बाद केले आणि भागीदारी तोडली.

त्यानंतर सिराजनेही आपली कमाल दाखवली. अवघ्या काही काळात इनिंग संपली. प्रोटीआजचा संघ १५३ वर बाद झाला.

पिचलाही मध्ये मध्ये खेळण्याचा मूड होता. त्यामुळे तिला हवे तसे ती वागत होती. त्यामुळे पाठलाग सोपा नसणारच होता. भारताने लढा दिला, प्रयत्न केले आणि टिकून राहिला. परंतु दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. भारत ०-१ ने पिछाडीवर राहिला असून त्यांना विजयासाठी ३० धावा कमी पडल्या. आता पुढचा कसोटी सामना गुवाहाटीत होईल.

भारताचा घरच्या खेळपट्टीवरचा रेकॉर्ड चांगला आहे आणि आम्ही सर्व प्रयत्न करून मालिका बरोबरीत राहील याची काळजी घेणार आहोत.

थोडक्यात धावसंख्या: भारत १८९/१० (केएल राहुल ३९, सायमन हार्मर ४/३०) आणि ९३/१० (वॉशिंग्टन सुंदर ३१, सायमन हार्मर ४/२१) दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभूत १५९/१० (एडेन मार्क्रम ३१, जसप्रीत बुमराह ५/२७) आणि १५३/१० (टेम्बा बावुमा ५५*, रवींद्र जडेजा ४/३०).