IPL Match 11 | RCBvMI पूर्वावलोकन: एकेक पाऊल पुढे टाकूया...

मागच्या घरच्या खेळपट्टीवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यात मिळालेल्या विजयानंतर एमआयची पूर्ण टीम एकाच दिशेने काम करू लागली. रोहित शर्मा दुखापतीनंतर परतला असून त्याने धावांचा पाऊल पाडला ही आपल्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. रायन रिकल्टन चांगल्या फॉर्मम्ये असून त्यानेही त्याला दुसरीकडे पाठबळ दिले. रघू शर्माने प्रामुख्याने मधल्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला धावा घेऊ दिल्या नाहीत. त्याला आयपीएलमधली पहिली विकेटही मिळाली. 💙

आता आपण आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्याच्या शेवटच्या भागात आलो आहोत. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक ओव्हर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळणे यामुळे मुंबई इंडियन्सचे भवितव्य निश्चित होईल. आता हाय व्होल्टेज सामना होणार असून वानखेडेवर झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचे ध्येय समोर आहे. 👊

गणित सोपे आहे. अजून चार सामने बाकी आहेत आणि प्रत्येक सामना अंतिम सामन्यासारखा खेळायचा आहे. तसे झाल्यास आपल्या हातात १४ गुण असतील. एमआयच्या टीमने मागील काही वर्षांत क्रिकेट जगताला एक गोष्ट शिकवली आहे. ती म्हणजे संकट मोठे होते तेव्हा आम्हाला कधीही कमी लेखायचे नाही. ड्रेसिंग रूममध्ये एकच संदेश दिला गेला आहे. शेवटपर्यंत लढत राहा. ✊

रायपूरमध्ये जलदगती चेंडू, चांगली रेषा आणि लांबी व डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर्ससोबत मधल्या ओव्हर्स चांगल्या रितीने हाताळणारी टीम या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकू शकेल. दोन्ही इनिंग्समध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्स महत्वाच्या असतील. या स्पर्धेत जसप्रीत बुमराह विरूद्ध विराट कोहली यांच्यावर कायम लक्ष असते. सलामीसाठी येणारा रोहित शर्मा भुवनेश्वर कुमारचे स्विंग आणि अचूक गोलंदाजीसाठी सज्ज असेल. तिलक वर्मा विरूद्ध आरसीबीचे स्पिनर्स. स्पिनशी खेळताना त्याची शास्त्रशुद्ध फलंदाजी आणि संयम यांच्यामुळे टीव्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो कारण सीमारेषा मोठ्या आहेत. 

कधी: १० मे २०२६ | सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर

काय अपेक्षा आहे: काळ्या मातीची खेळपट्टी असल्याने सामना संतुलित होईल. पहिल्या काही ओव्हर्समध्ये जलदगती गोलंदाजांना चेंडूला चांगली हालचाल आणि उसळी मिळेल. सामन्याच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात दंव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात चेंडूला पकड घेणे कठीण होईल. नाणेफेक जिंकणारे संघ अनेकदा प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतात. इतर मैदानांच्या तुलनेत या मैदानावर आउटफिल्ड मोठे आहे, त्यामुळे विकेट्समध्ये धावणे महत्त्वाचे ठरते. चेंडू बॅटवर चांगला येतो, पण येथे केवळ प्रचंड ताकदीपेक्षा फटक्यांचे टायमिंग आणि प्लेसमेंट महत्त्वाचे ठरते.

आकडेवारी

खेळलेले सामने (एकूण)

३५

एमआयने जिंकले

१९

आरसीबीने जिंकले

१५

बरोबरीत

१ (आरसीबी)

 

एमआय

आकडेवारी

आरसीबी

रोहित शर्मा (६४८ धावा)

सर्वाधिक धावा

विराट कोहली (९७२ धावा)

जसप्रीत बुमराह (२९ विकेट्स)

सर्वाधिक विकेट्स

युजवेंद्र चहल (२२ विकेट्स)