आयपीएल सामना 3 | RRvMI: दिल्लीतल्या पराभवाला मागे टाकून गुवाहाटीत आगमन
पलटन, तुम्ही तुमचे आवडते ब्लू अँड गोल्ड जर्सी घेतले आहेत ना... 👊, कारण आता सामना आहे राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्सचा. आम्हाला अजिबात ताण नाहीये. ही एक मोठी स्पर्धा हे आणि पारडे कधीही बदलू शकते. हे दोन्ही संघ मैदानात समोरासमोर येतात तेव्हा स्टेडियम्सना जादू पाहायला मिळते. त्यांना असे फिनिशेस पाहायला मिळतात जे आपल्याला खुर्चीवर बसू देत नाहीत. काही सामने स्वतःचा एक मूड घेऊन येतात. उत्तम कामगिरी आणि निर्भय निर्णय कोणतीही स्क्रिप्ट पटकन बदलू शकतात. सामान्य संध्याकाळ आयपीएलच्या कथेत एक अद्भुत बदल घेऊन येऊ शकते. 💙
दिल्लीत एक छोटासा धक्का बसल्यानंतर गुवाहाटीत पुन्हा खेळायला येत असताना आपल्या काही जुन्या आठवणींची उजळणी करूया आणि या स्पर्धेत एमआयच्या सर्वांत खास क्षणांच आठवण काढूया. 🏏
एमआयचे भवितव्य ठरवणारा ईडन गार्डन्सवरचा खेळ (२०१३)
मुंबई इंडियन्ससाठी २४ मे २०१३ हा दिवस अत्यंत खास ठरला. ही टीम आयपीएलमधील क्वालिफायर २ सामन्यासाठी ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्ससमोर आली. पीओटीएम हरभजन सिंगच्या ३/२३ च्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाला २० ओव्हर्समध्ये १६५/६ वर थांबवले. एमआयने ही धावसंख्या एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. 💪
*****
आदित्य (चमकदार) तारे!!!! (२०२५)
पलटनला २५ मे रोजी घरच्या खेळपट्टीवर एक जादुई पाठलाग पाहायला मिळाला. फलंदाजीतील अशी एक मेजवानी जिथे सर्वांचे डोळे दिपले होते. प्लेऑफ्ससाठी पात्र ठरण्यासाठी जिंकणे आवश्यक असलेला हा सामना होता. एमआयला १४.३ ओव्हर्समध्ये आरआरच्या १८९ धावांचा पाठलाग पूर्ण करायचा होता. पीओटीएम कोरी अँडरसनने आपल्याला नाबाद ९५ धावांसह स्पर्धेत कायम ठेवले. परिस्थिती बदलली, वातावरणात तणाव निर्माण झाला आणि एका फटक्याने सगळे बदलले. १४.३ ओव्हर्समध्ये धावसंख्या बरोबरीत होत असताना आदित्य तारेने एका जादा चेंडूवर षट्कार ठोकला आणि एमआयला सामना जिंकून एनआरआरवर पात्र व्हायला मदत केली. 🤯💥
*****
आयपीएलच्या १००० व्या सामन्यात स्कायच्या वेगवान ५५ धावांमुळे एमआयला विजय मिळवायला मदत केली (२०२३)
एमआयने वानखेडेवर झालेल्या १००० व्या आयपीएल सामन्यात तीन चेंडू शिल्लक असताना २१३ धावा पूर्ण करून विजय मिळवला. सूर्यादादाने अप्रतिम अर्धशतक पूर्ण करताना २९ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि २ षट्कार मारले. 👏
*****
तिलक वर्माच्या लढाऊ ६५ धावा- जयपूरमध्ये देखणा खेळ (२०२४)
रॉयल्सच्या भूमीत अत्यंत कठीण परिस्थितीत टीव्ही खंबीर उभा राहिला आणि त्याने संयम व परिपक्वतेने खेळ केला. त्याने ४५ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि ३ षट्कारांचा समावेश होता. त्यामुळे तणाव कमी होऊन एमआयचा खेळ उभा राहिला. हा सामना आपण जिंकला नसला तरी आपला तिलक आपल्या विश्वासू खेळाडूंपैकी एक असल्याचे सिद्ध झाले. 💪
*****
एमआयच्या विजयात हातभार लावणारे वर्चस्व (२०२५)
एमआयने मागील वर्षी जयपूरमध्ये आरआरविरूद्ध १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. रायन रिकल्टन (६१) आणि रोहित शर्मा (५३) यांनी सुंदर खेळ केला. सूर्या आणणि हार्दिक या दोघांनी प्रत्येकी नाबाद ४८ (२३) धावा केल्या. त्यामुळे एमआयला २० ओव्हर्समध्ये २१७/२ धावा उभारता आल्या. 🥵
*****
आकडेवारी
|
खेळलेले सामने |
३२ |
|
एमआयने जिंकले |
१७ |
|
आरआरने जिंकले |
१५ |
| एमआय | आकडेवारी | आरआर |
| सूर्यकुमार यादव (४७२ धावा) | सर्वाधिक धावा | संजू सॅम्सन (६४० धावा) |
| जसप्रीत बुमराह (१९ विकेट्स) | सर्वाधिक विकेट्स | शेन वॉट्सन (१३ विकेट्स) |
आता स्टेज तयार आहे. आणखी एका ब्लॉकबस्टर सामन्याची प्रतीक्षा आहे.