#KeepTheFaith… संथ सुरूवात आणि तरीही कामगिरी दमदार... एमआय स्टाइलमध्ये

पलटन, तुम्ही तुमच्या लाडक्या मुंबई इंडियन्स टीमला बऱ्याच काळापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेलच की हा एक तात्पुरता टप्पा आहे 💙. सर्वोत्तम कामगिरी कायम संथ खेळापासून सुरू होते. आम्ही संथ सुरूवातीसाठी ओळखले जातो. परंतु एकदा लय सापडली की मग आम्ही थांबत नाही. या प्रक्रियेत विश्वास, ग्रुपमध्ये आस्था आणि सामने जिंकण्याची भूक असते.

आता वेळ आलीय. पाऊल मागे घ्यायची नाही तर आपण एकत्र राहिले पाहिजे, मुंबई इंडियन्सवर प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे. आपला उत्साह कायम ठेवूया, परिस्थिती लगेचच बदलेल. प्रत्येक जयघोष आणि प्रार्थना टीमसाठी महत्त्वाची आहे. आमच्या चाहत्यांमुळे लढा सोपा होतो. आमच्या या खास प्रवासाचा तुम्ही कायम भाग होतात आणि आहात.  

टीमला लय सापडली की ती फक्त विजयी होत नाही तर तिचा वारू सुसाट सुटतो. एक सामना, दोन सामने आणि त्यानंतर एकामागून एक सामने जिंकले जातात. कधीकधी मनात शंका असलेले सगळेच आश्चर्यचकित होतात. पलटन, तुम्हाला संथ आणि अस्वस्थ वाटत असल्यास खोल श्वास घ्या आणि लक्षात घ्या की परिस्थिती बदलते. आपण हे आधीही पाहिले आहे. कठीण परिस्थितीतून यशापर्यंत, योग्य वेळी कथानक बदलेल आणि विजय नावावर होईल. 

मागील काही वर्षांत आपण संथ सुरूवात केली आणि त्यानंतर टॉप फोरपर्यंत मजल मारली होती.

वर्ष

पहिल्या चार सामन्यानंतर

अंतिम स्थान

२०१४

पहिले चार हरले

चौथे

२०१५

पहिले चार हरले

विजयी

२०२५

एक जिंकला तीन हरले

तिसरे

एमआयचा संघ २०१४ मध्ये अत्यंत नाट्यमय पद्धतीने प्लेऑफ्समध्ये पोहोचला होता. राजस्थान रॉयल्सविरूद्ध शेवटच्या लीग सामन्यात कठीण परिस्थिती असताना आदित्य तारेने एक्स्ट्रा बॉलवर षट्कार ठोकून मुंबई इंडियन्सला एनआरआरवर प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून दिला होता. २०१५ मध्ये सुरूवातीला सलग चार सामने हरल्यानंतर आपल्याला सनसनाटी कमबॅकचा अनुभव मिळाला आणि आपण दुसरा आयपीएल सामना जिंकला 😍. त्यानंतर एमआयने शेवटच्या आठ लीग सामन्यांपैकी सात जिंकले आणि गुणतक्त्यावर दुसरा क्रमांक मिळवला. २०२५ मध्येही कठीण सुरूवात झाल्यानंतर सीझनच्या मध्यावर सहा सामने जिंकून प्लेऑफ्समध्ये धडक मारली. 🔥

पलटन, निराश होऊ नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. एमआयचा उदय होतो तेव्हा ही टीम कुठेही थांबत नाही. 💪