वेस्ट इंडिज विरूद्ध भारत ५ वी टी२०आयः स्पिनर्सची जादू, भारताचा ८८ धावांनी दणदणीत विजय

भारताने लॉडेरहिलवर वेस्ट इंडिजविरूद्ध ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांची टी२०आय मालिका भारताने ४-१ ने खिशात टाकली आहे. 

श्रेयस अय्यरच्या ४० चेंडूंमध्ये ६४ धावा आणि रवी बिष्णोईच्या ४/१६ या कामगिरीमुळे पाहुण्या संघाला २० ओव्हर्समध्ये १८८/७ ची धावसंख्या साधता आली. दरम्यान विंडीजचा संघ १५.४ ओव्हर्समध्ये १०० धावांवर बाद झाला. 

भारताचा तात्पुरता कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करायचे ठरवले. या दोन्ही टीम्सनी आपल्या खेळणाऱ्या ११ च्या संघात चार बदल केले. त्यातून काही राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली. 

भारतासाठी पंड्या, ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव हे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी खेळण्यास उतरले. 

यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने ब्रँडन किंग, कायली मायर्स, अकील होसेन आणि अल्झारी जोसेफ यांच्याऐवजी शमरा ब्रुक्स, ओडियन स्मिथ, कीमो पॉल आणि हेडेन वॉल्श यांना खेळण्याची संधी देण्यात आली. 

भारताने चांगली सुरूवात करून सक्तीच्या पॉवरप्लेमध्ये ५३/१ ची धावसंख्या उभी केली. ओपनर ईशान किशनला डॉमिनिट ड्रेक्सने ११ धावांवर बाद केले. 

श्रेयस अय्यर आणि दीपक हूडा यांच्यादरम्यान झालेल्या ७६ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ १०.२ ओव्हर्समध्य शतक पूर्ण करू शकला. 

परंतु हे दोघेही १२ व्या आणि १३ व्या ओव्हरमध्ये बाद झाले. हेडन वॉल्शने १२ व्या ओव्हरमध्ये हूडाची विकेट घेतली तर अय्यरच्या ४० चेंडूंवरील ६४ धावांच्या कामगिरीला पुढील ओव्हरमध्ये जेसन होल्डरने खीळ घातली. 

हार्दिक पंड्याची उशिराने केलेली उत्तम कामगिरी (१६ चेंडूंमध्ये २८ धावा) भारताला १८० पेक्षा अधिक धावांवर घेऊन गेली. परंतु तो शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. 

ओडियन स्मिथ हा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज गोलंदाज ठरला. त्याने टी२०आय क्रिकेटमध्ये आपल्या करियरमधली सर्वोत्तम ३/३३ ची कामगिरी केली. 

विंडीजचा संघ १८९ धावांच्या पाठलागासाठी उतरला खरा, परंतु त्यांची सुरूवात डळमळीत झाली. ते पहिल्या सहा ओव्हर्समध्ये ३३/३ वर चाचपडत होते. 

जेसन होल्डरने विंडीजसाठी खेळी सुरू केली. परंतु या दुसऱ्या इनिंगच्या फक्त तीन चेंडूंमध्ये शून्य धावा देऊन अक्झर पटेलने त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 

अक्झर या वेळी यजमान संघासाठी एक मोठी डोकेदुखी ठरला. त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये शमरा ब्रुक्त (१३) आणि डेवॉन थॉमस (१०) यांच्या विकेट्स घेतल्या. या डावखुऱ्या गोलंदाजासाठी या विकेट्स दिलासा देणाऱ्या ठरल्या कारण त्याने पाचव्या ओव्हरमध्ये तब्बल १३ धावा दिल्या.

वेस्ट इंडिजचा संघ ७.४ ओव्हर्समध्ये ५० धावांवर पोहोचला. परंतु त्यांच्या वारंवार विकेट्स जाऊ लागल्या. कर्णधार निकोलस पूरनची विकेट कुलदीप यादवने घेतली. ही त्याची या सामन्यातल्या तीन विकेटसपैकी पहिली विकेट होती. 

सामन्यातील १३ वी ओव्हर भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली. कुलदीपने शून्य धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या चेंडूवर टाकलेल्या गुगलीने फक्त १ धाव काढलेल्या डॉमनिक ड्रेक्सला चकवले तर ओडियन स्मिथ शून्यावर बाद झाला. 

अत्यंत तणावपूर्ण वातावरणात २८ चेंडूंवर ५० धावा फटकावल्यानंतर डेथ ओव्हर्सच्या पहिल्या चेंडूवर ५६ धावा काढलेला शिमरॉन हेटमायर बाद झाला. (१६-२०.)

वेस्ट इंडिजचा १५.४ ओव्हर्समध्ये १०० धावा करून सर्व बाद झाला. भारतीय स्पिनर्सचे त्रिदेव अक्झर पटेल (३/१५), कुलदीप यादव (३/१२) आणि रवी बिष्णोई (४/१६) यांनी प्रत्येकी तीनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या.

अक्झप पटेलला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला तर अर्शदीप सिंगने ६.५८ सरासरीने सात विकेट्स घेतल्यामुळे मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

भारताने वेस्ट इंडिजसोबतची आपली पाच सामन्यांची टी२०आय मालिका ४-१ ने जिंकली आहे. त्यांचा पुढील टी२० सामना या महिन्यात नंतर एशिया कप २०२२ हा असेल.