मुल्लानपूर येथील 'महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम'वर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या विकेटपर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले. यजमान भारताने सलग तीन दिवस सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले... फलंदाजांची शतके आणि गोलंदाजांची उत्कृष्ट व शिस्तबद्ध कामगिरी यांच्या जोरावर भारताने अलिकडच्या काळातील आपल्या सर्वात मोठ्या कसोटी विजयावर शिक्कामोर्तब केले.