
२०२१ मध्ये २-२, २०२५ मध्ये एक पाऊल पुढे?
पलटन, मागच्या वेळी भारताने इंग्लंडचा दौरा केला ते तुम्हाला आठवते का? हो, ती २०२१-२२ ची मालिका– ही मालिका अगदी जबरदस्त गोलंदाजीपासून जल्लोषापर्यंत सर्व काही देते.
लॉर्ड्सवरच्या त्या दिवसाची उजळणी करूया- भारत हरायच्या बेतात होता. बाहेरच पडणार होता. मग तर धूम... बूम 💥 ने आपल्याला वाचवले.
जसप्रीय बुमराह आणि मोहम्मद शामी यांनी ८९ धावांची नाबाद भागीदारी केली. मग आपण गोलंदाजी करायला उतरलो तेव्हा संदेश स्पष्ट होता.
“हे ६० ओव्हर्स त्यांना नरकासमान वाटले पाहिजेत.”
आणि त्यांना खरोखरच वाटले. 🔥
पण ती तर बुमराहची फक्त सुरूवात होती. नंतर संपूर्ण मालिका आपल्याला आठवते. बूम बूमने २३ विकेट्स घेतल्या. पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले आणि जणू काही फारसे घडलेले नसावे अशा प्रकारे मालिकापटूची ट्रॉफी घेऊन गेला.
आणि हो त्याने एका ओव्हरमध्ये ३५ धावा कुटल्या. कसोटीचा विक्रम नोंदवला आणि गोलंदाजांना हे सांगितले की त्याला हवे तेव्हा तो उत्तम फलंदाजी करू शकतो. 😎
Bumrah is going B💥💥M-B💥💥M! 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) July 2, 2022
3⃣5⃣ of the over 🤯
🇮🇳: 412/9 (84)#OneFamily #ENGvIND pic.twitter.com/p4dQsoLy5Y

मग ती ओव्हलवरची जादू. टायमिंग, वेग आणि वर्चस्व दाखवणाऱ्या रोच्या १२७ धावा. इंग्लंडने सर्व प्रयत्न करून पाहिले. पण हिटमॅनने त्यांना सैल सोडले नाही.
ते शतक सामना पालटवणारे ठऱले. 💯💙

अर्थात आपण हे कसे विसरू शकतो... जसप्रीत बुमराह एडबास्टनवर कर्णधार म्हणून प्रथमच खेळायला आला.
ही मालिका २-२ वर सुटली.
आता आपल्यासमोरचा प्रश्नः आपला हा निर्भय भारतीय संघ २०२५ मध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकतो का👀
कारण २०२१ मध्ये आपल्याला एवढे नाट्य पाहायला मिळाले तर पुढे काय होईल काय सांगावे? 👊🇮🇳