“नमन आणि मी चुकीच्या वेळी आऊट झालो, १५-२० धावा कमी पडल्या”: स्काय
“१८०-१८५ ही चांगली धावसंख्या ठरली असती,” दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यात झालेल्या कठीण पराभवानंतर सूर्यकुमार यादवने आपले मत व्यक्त केले. दिल्लीचा संघ दोन विकेट्स पडल्यानंतर चिंतेत असताना सातव्या क्रमांकावर समीर रिझवी खेळायला उतरला आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याऐवजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून खेळायला उतरलेल्या स्कायने त्याला या खेळाचे श्रेय दिले.
“तो असा दणक्यात आला आणि त्याने जबरदस्त फलंदाजी केली. हे सर्व श्रेय त्याला जाते असे मला वाटते. त्याने आम्हाला सामन्यात टिकूच दिले नाही. आम्ही त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली तशी उत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही पुनरागमन करू शकलो नाही,” असे त्याने सामन्यानंतरच्या संवादात सांगितले.
एमआयच्या फलंदाजीदरम्यान हा दिवस सूर्याच्या नावावर होता त्याने या सामन्यात आणखी एक आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. तो टीम १८/२ वर असताना आला, रोहित शर्मा उत्तम टायमिंगने खेळत असताना त्याच्यासोबत उतरला आणि त्याच्यासोबत ५३ धावांची भागीदारी केली. त्याने रोहित आणि शेरफाने रदरफोर्ड एकामागून एक बाद झाल्यानंतर नमन धीरसोबत ३७ धावांची भागीदारीही केली. 🫡
परंतु प्लॅटफॉर्म अंतिम फटकेबाजीसाठी खुला झाला तेव्हा म्हणजे १६ व्या ओव्हरमध्ये टीम १२२/४ वर असताना स्कायला लुंगी गिडीने एलबीडब्ल्यू केले. नमनने त्यानंतर प्रचंड मेहनत केली परंतु इनिंगमध्ये आठ चेंडू शिल्लक असताना २१ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला.
“आम्हाला १५-२० धावा कमी पडल्या. आम्ही म्हणजे मी आणि नमन १६ व्या आणि १८ व्या ओव्हरमध्ये चुकीच्या वेळी बाद झालो. अन्यथा आम्ही आणखी धावसंख्या वाढवू शकलो असतो,” स्काय म्हणाला.
दीपक चहरने उत्तम गोलंदाजी सुरू केली. त्यानेही टीमला थोड्या धावा कमी पडल्याचे मत व्यक्त करून सामना हातातून नेल्याचे श्रेय रिझवीला दिले.
“आम्हाला धावा कमी पडल्या. दुपारच्या सामन्यात १६० धावांचा बचाव करणे थोडे कठीण असते. १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला विकेट्स पटापट घ्याव्या लागतात. समीर रिझवीने उत्तम कामगिरी केली. पहिल्या दहा ओव्हर्समध्ये त्याला आम्ही बाद केले असते तर सामना रोमांचक झाला असता,” असे चहरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
“टी२०मध्ये विकेट घेणारी गोलंदाजी अत्यंत घातक असते. तुम्हाला कोणाला बाद करायचे असल्यास तुम्हाला वेग वाढवून स्टंप्सवर गोलंदाजी करावी लागते. परंतु या गोष्टी धोकादायक असतात कारण चेंडू एक किंवा दोन ओव्हर्सच्या पलीकडे स्विंग होत नाही. तुम्ही १६० धावांचा बचाव करत असता तेव्हा अशी गोलंदाजी करता येत नाही. तुम्हाला फलंदाजांवर दबाव कायम ठेवण्यासाठी शून्य धावा देणारे चेंडू टाकावे लागतात. त्यांना सातत्याने चौकार षट्कार मारता येत होते. आम्ही वाईट गोलंदाजी केली असे नाही. आम्ही आमच्या योजना नीट पार पाडल्या परंतु, तो चांगले खेळला. शिवाय १६० धावांचा पाठलाग करताना एक किंवा दोन मोठ्या ओव्हर्स समोरच्या टीमला आघाडी मिळवून देऊ शकतात,” असे तो म्हणाला.
या सामन्यातून घेण्यासारखे एमआयकडे बरेच काही होते. रोहितची सातत्यपूर्णता, स्कायला आपला सूर गवसणे, बुमराहने १३ व्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव देणे, नमन आणि मिशेल सँटनर यांनी मधल्या फळीत समन्वय साधणे आणि फिनिशिंगसाठी प्रयत्न करणे अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. आता टीम राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळण्यासाठी गुवाहाटीला जात असताना पुन्हा एकदा टीम वेग पकडेल आणि विजयी हील याची खात्री आहे. 👊