
इंग्लंड विरूद्ध भारत तिसरा टी२०आयः यजमान संघाकडून २१५ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग
इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत ३-० ने व्हाइटवॉश टाळताना नॉटिंगहम येथे भारताचा १७ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने टी२०आय मालिका २-१ ने जिंकली.
यजमान संघाने २० ओव्हर्समध्ये उभारलेली २१५/७ ही धावसंख्या भारतासाठी जास्त ठरली. सूर्यकुमार यादवने ५५ चेंडूंमध्ये ११७ धावांचा पाऊस पाडल्यानंतरही भारताला १९८/९ एवढीच धावसंख्या गाठता आली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यावर सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघात मॅट पार्किन्सन आणि सॅम कुरान यांच्या जागेवर फिल सॉल्ट आणि रीस टॉपली खेळायला आले. त्याचवेळी भारताने श्रेयस अय्यर, अवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिष्णोई यांना हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि युजवेंद्र चहल यांच्याऐवजी खेळवले.
इंग्लंडने आपली पहिली विकेट ३.४ ओव्हर्समध्ये गमावली. कर्णधार जोस बटलरने नऊ चेंडूंमध्ये १८ धावा फटकावल्या. या सलामीच्या फलंदाजाने कव्हर्समधून फ्लॅट बॅट ड्राइव्ह मारायचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकल्यामुळे अवेश खानचा पूर्ण लांबीचा चेंडू आतल्या बाजूला स्टंप्सवर येऊन आदळला.
यजमान संघ ५.४ ओव्हर्समध्ये ५० धावांपर्यंत पोहोचला. त्यांनी आपला पॉवरप्लेचा टप्पा ५२-१ वर पूर्ण केला.
जेसन रॉय आठव्या ओव्हरच्या सुरूवातीला २७ धावांवर तंबूत परतला. उमरान मलिकच्या लांबच्या टप्प्यात पडलेल्या चेंडूने बॅटच्या कडेला स्पर्श केला आणि ऋषभ पंतने त्याची विकेट घेतली.
फिल सॉल्ट क्रीझवर १२ मिनिटे टिकला. हर्षल पटेलचा अत्यंत खाली आलेला फुल टॉस चेंडू यॉर्करमध्ये रूपतांतरित झाला आणि ऑफ आणि मधल्या स्टंपच्या खालच्या बाजूला आदळला.
डेव्हिड मालनने इंग्लंडला सहा ओव्हर्समध्ये ८६/३ वरून १६७/३ वर नेऊन डाव सावरायला मदत केली. त्याने १२.२ ओव्हर्समध्ये ३० चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले.
रवी बिष्णोईने टाकलेली १७ वी ओव्हर भारतासाठी निर्णायक ठरली. त्याने मालनला ७७ वर आणि मोई अलीला शून्यावर बाद केले. या स्पिनरने आपली शेवटची ओव्हर दोन धावांवर दोन विकेट्स देऊन पूर्ण केली.
अवेश खानची १८ वी ओव्हर भारतासाठी महागडी ठरली. कारण या ओव्हरमध्ये इंग्लंडने २१ धावा केल्या. त्यानंतर हर्षल पटेलने आपल्या चौथ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आठ धावा देऊन हॅरी ब्रूकला बाद केले.
इंग्लंडने नॉटिंगहममध्ये झालेल्या तिसऱ्या टी२०आयच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १७ दावा आणि शेवटच्या चेंडूवर एक खेळाडू धावबाद झाल्यामुळे भारतासमोर २१६ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले.
भारताचा धावाचा पाठलाग सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये एक धाव काढून बाद झाला. रीस टॉपलीचा चेंडू बॅटच्या कडेला आणि पंतच्या मागच्या पायाला लागला. त्यानंतर तो विकेटकीपर जोस बटलरच्या हातात विसावला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने अत्यंत आक्रमक खेळ करून पहिल्याच चेंडूवर एक चौकार आणि डेव्हिड विलीच्या तीन चेंडूंवर षटकार ठोकले. परंतु कोहलीने कव्हर्समधून वाइड लेंथ डिलिव्हरी फटकवायचा प्रयत्न केला. पण चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर जेसन रॉयच्या हातात गेला. त्यामुळे कोहली लगेचच बाद झाला.
टॉपलीने आपली दुसरी ओव्हर भारताचा कर्णधार रोहित शर्माची विकेट घेऊन संपवली. रोहितने या जलदगती गोलंदाजाच्या स्लो डिलिव्हरीला स्क्वेअर डीप मिडविकेटवर फटकावले. तिथे तयारीतच असलेल्या फिल सॉल्टने त्याला बाद केले.
भारताने ७.१ ओव्हर्समध्ये एक धाव काढून आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. त्यांनी १० ओव्हर्समध्ये ८२/३ अशी कामगिरी केली. त्याच टप्प्यावर इंग्लंड ८६/३ वर होते.
भारताच्या परतहल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूंमध्ये पन्नास धावा फटकावल्या. त्याने लियाम लिव्हिंग्सटनच्या तेराव्या ओव्हरमध्ये दोन षटकार ठोकले आणि २१ धावा काढल्या.
भारताने १५ ओव्हर्समध्ये १५० धावा काढल्या. परंतु त्यांनी शेवटच्या टप्प्यातील पहिल्या चेंडूवर श्रेयस अय्यरची विकेट गमावली. अय्यरने बटलरच्या चेंडूवर शॉट मारायचा प्रयत्न केला. परंतु रीस टॉपलीच्या कमी लांबीच्या चेंडूने थोडी दिशा बदलली आणि तो सरळ इंग्लंडच्या कर्णधाराच्या हातात जाऊन विसावला.
अय्यर बाद झाल्यामुळे स्काय आणि त्याच्यामधील ११९ धावांची चौथ्या विकेटसाठीची भागीदारी संपुष्टात आली. या ६ ते १५ ओव्हर्सच्या टप्प्यात भारताला थोडी परिस्थिती सुधारता आली.
सूर्यकुमार यादवने ४८ चेंडूंमध्ये आपले पहिले शतक फटकावले. तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक फटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
दिनेश कार्तिक हा डेव्हिड विलीचा दुसऱा आणि शेवटचा बळी ठरला. आपल्या सरावलेल्या फलंदाजाने एक फटका फाइन शॉर्ट लेगच्या पलीकडे मारायचा प्रयत्न केला. परंतु विलीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरच्या बाजूला जाऊन आपटला. खेळाडूंनी पुनरावलोकनाची मागणी केली. त्यातून दिनेश कार्तिक लेग बिफोर विकेट (एलबीडब्ल्यू)वर बाद झाल्याचे स्पष्ट झाले.
रिचर्ड ग्लीसनने रवींद्र जडेजाला एलबीडब्ल्यूवर बाद केल्यामुळे इंग्लंडच्या खात्यात आणखी एक महत्त्वाची विकेट जमा झाली.
सूर्यकुमार यादवने १२ चेंडूंमध्य ४१ धावांची गरज असताना तीन चेंडूंवर १४ धावा फटकावल्या. परंतु त्याची ही देखणी खेळी १८.५ ओव्हर्समध्ये संपली. स्कायच्या ५५ चेंडूंमध्ये ११७ धावा या रोहित शर्माने २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध फटकावलेल्या ११८ धावांनंतर भारतासाठी टी२०आयमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा स्कोअर ठरला आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनने २१ धावांचा बचाव केला. त्याने फक्त तीन धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. भारताने २० ओव्हर्समध्ये १९८ /९ ची धावसंख्या उभी केली.
भारताला रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली सर्व स्वरूपांमध्ये २० खेळलेल्या सामन्यांपैकी १७ धावांनी पहिला पराभव सोसावा लागला आहे. मागील वेळी रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दिल्लीत झालेल्या बांग्लादेशविरूद्धच्या टी२०आय सामन्यात २०१९ मध्ये पराभव पत्करला होता.
टी२०आय मालिका आता संपली आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना ओव्हलवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल.