News

वेस्ट इंडिज विरूद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामनाः भारताला १२ व्या मालिका विजयाची आस

By Mumbai Indians

भारताने क्वीन्स पार्क ओव्हलवर वेस्ट इंडिजविरूद्ध दोन विकेट्सनी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी २-० अशी आघाडी घेतली आहे.

अक्झर पटेलच्या ३५ चेंडूंमधील ६४ नाबाद धावांमुळे यजमान संघाला ४९.४ ओव्हर्समध्ये अगदी सहजपणे ३१२ चे लक्ष्य साध्य करता आले. अक्झरच्या धावांच्या लुटीमुळे शाय होपचे वादळी शतक (१३५ चेंडूंमध्ये ११५ धावा) वाया गेले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पर्याय निवडला. दोन्ही टीम्सनी आपल्या ११ खेळाडूंमध्ये फक्त एकच बदल केला. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णाच्या जागेवर आवेश खानला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याचवेळी यजमान वेस्ट इंडिज संघाने गुदाकेश मोतीच्या बदली हेडेन वॉल्शला खेळवले.

वेस्ट इंडिजच्या संघाने पॉवर प्लेमध्ये ७१-१ अशी धावसंख्या उभारली. कायली मेयर्स ३९ वर बाद झाला. मेयर्स आणि शाय होप यांच्या सलामीच्या जोडीने यजमान संघाला ७.१ ओव्हर्समध्ये ५० धावा काढता आल्या आणि होपच्या फलंदाजीमुळे कॅलिप्सो किंग्स १६.२ ओव्हर्समध्ये १०० धावांपलीकडे गेले.

समर्थ ब्रूक्स (३५) आणि ब्रँडन किंग (०)च्या विकेट्सस गमावल्यानंतर शाय होप आणि निकोलस पूरन यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हा संघ ४४ ओव्हर्समध्ये २५० पर्यंत पोहोचला.

आपला १०० वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या होपने आपले शतक १२४ चेंडूंमध्ये पूर्ण केले आणि वेस्ट इंडिजचा संघ ३०० पर्यंत पोहोचल्यानंतर शार्दुल ठाकूरने त्याला ४९ व्या ओव्हरमध्ये बाद केले.

वेस्ट इंडिजने ५० ओव्हर्समध्ये अपली इनिंग ३११/६ वर पूर्ण केली आणि भारताला ३१२ चे ध्येय दिले. शार्दुलसाठी भारताची ही इनिंग सर्वोत्तम गोलंदाज म्हणून संपली. त्याने ५४ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाची सुरूवात तुलनेने डळमळीत झाली. विंडीज रोमिओ शेफर्ड आणि कायले मेयर्स यांनी १७.२ ओव्हर्समध्ये ७९/३ या अवस्थेत भारताला आणून ठेवले.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेय अय्यरने भारतीय फलंदाजीत जान ओतली. त्याने संजू सॅम्सनसोबत चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.

अय्यर बाद झाल्यावर (७१ चेंडूंमध्ये ६३ धावा) सॅम्सनने (५१ चेंडूंमध्ये ५४ धावा) लढाई सुरूच ठेवली. त्याने दीपक हूडासोबत भारताला २०० पेक्षा अधिक धावांवर नेले.

सॅम्सन ३९ व्या ओव्हरमध्ये रन आऊट झाल्यावर क्रीझवर अक्झर पटेल आला.

पटेलने २१ ओडीआय इनिंग्समध्ये २०२ धावा काढल्या. त्याने दीपक हूडासोबत ५१ धावांची भागीदारी केली आणि ११ ओव्हर्समध्ये १०५ धावांच्या गरजेपासून शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये ५६ धावांची गरज असेपर्यंत भारतीय संघाला आणले.

त्यानंतर शार्दुल ठाकूर (३) आणि अवेश खान (१०) यांच्यासोबत २४ धावांच्या भागीदारीमुळे भारताला आवेश खानने पराभवाच्या दाढेतूनच खेचून आणले नाही तर २७ चेंडूंमध्ये एकदिवसीय सामन्यातील आपले पहिले अर्धशतकही पूर्ण केले.

भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये आठ धावांची गरज होती हातात दोन विकेट्स होत्या. परंतु पहिल्या चेंडूंमध्ये त्यांना फक्त दोनच धावा करता आल्या. आता तीन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज असताना अक्झरने कायले मेयर्सच्या चौथ्या चेंडूवर एक जोरदार षटकार ठोकला आणि यजमान संघाला विजय मिळवून दिला.

हा सामना एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी अत्यंत अटीतटीच्या सामन्यांपैकी एक ठरला कारण त्यांनी ४१-५० ओव्हर्समध्ये १०० धावा काढल्या. आकडेवारीचा विचार करता शेवटच्या १० ओव्हर्समध्ये (४१-५०) २००१ पासून सर्वाधिक काढलेल्या धावांमध्ये या धावांचा चौथा क्रमांक लागतो.

भारताने आता तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी तर घेतली आहेच पण वेस्ट इंडिजवरील १२ व्या सलग एकदिवसीय विजयाची नोंदही केली आहे.

दोन्ही संघ आता तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी बुधवार दिनांक २७ जुलै रोजी आमनेसामने येतील.