
भारतीय संघाचा विंडीजवर व्हाइटवॉशः तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११९ धावांनी विजय
भारतीय क्रिकेट टीमने यजमान वेस्ट इंडिज संघाचा पावसाने थांबवलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ओडीआय) सामन्यात ११९ धावांनी (डी/एल सूत्र) विजय मिळवला. भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये ३-० असा व्हाइटवॉश विजय मिळवला.
भारताकडून शिखर धवन (५८) आणि शुभमन गिल (९८ नाबाद) यांच्या अर्धशतकी कामगिरीने दमदार सुरूवात केली गेली. श्रेयस अय्यरच्या वेगवान ४४ धावांमुळे पाहुण्या संघाला ३६ ओव्हर्समध्ये २२५/३ पर्यंत पोहोचता आले. पावसानेही सतत हजेरी लावल्यामुळे अडीच दिवसांचा विलंब होऊन सामना ४० ओव्हर्सचा खेळवण्यात ला.
वेस्ट इंडिजला डीएलएस-सुधारित २५७ धावांचे लक्ष्य ३५ ओव्हर्समध्ये दिले गेले होते. ते साध्य केल्यास त्यांना व्हाइटवॉश टाळता आला असता.
धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाने सतत विकेट्स गमावल्या आणि त्यांचा संघ २६ ओव्हर्समध्ये १३७ धावा करून सर्वबाद झाला.
लेग स्पिनर युजवेंद्र चहलने भारताच्या वतीने विंडीजच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याने गोलंदाजी केलेल्या चार ओव्हर्समध्ये फक्त १७ धावा दिल्या आणि चार विकेट्स घेतल्या. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजसाठी कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी प्रत्येकी ४२ धावा केल्यामुळे ते सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले.
त्या दिवशी सुरूवातीला भारतीय कर्णधार शिखर धवन याने नाणएफेक जिंकली आणि सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धवन आणि गिल यांनी पाहुण्या संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली.
वेस्ट इंडिजला विकेटची नितांत आवश्यकता असताना लेग ब्रेकर हेडन वॉल्शने धवनला ५८ धावांवर बाद करून स्वतःचे स्थान बळकट केले.
त्यानंतर श्रेयस अय्यर गिलसोबत क्रीजवर आला. या दोघांनी वेस्ट इंडिजवर दबाव कायम ठेवला.
अय्यरने ३४ चेंडूंमध्ये धुंवाधार ४४ धावा केल्या. त्यानंतर विंडीज डावखुरा स्पिनर अकील हुसेनने त्याला बाद केले.
मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला फक्त आठ धावांवर वॉल्शने बाद केले.
दरम्यान, मध्ये मध्ये पाऊस पडत असल्यामुळे भारतीय इनिंग ३६ ओव्हर्सवर थांबवली गेली. त्यामुळे गिलला आपल्या एकदिवसीय सामन्यातील शतक पूर्ण करता आले नाही.
मोहम्मद सिराजने ३५ ओव्हर्समध्ये २५७ धावांसाठी उतरलेल्या विंडीज संघाला दुसऱ्या ओव्हरमध्ये एकामागून एक दोन विकेट्स काढून झटके दिले.
तिथून पुढे या कॅरेबियन संघाने प्रचंड प्रयत्न केले. परंतु त्यांना मातृभूमीवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासमोर हार पत्करावी लागली.
शुभमन गिलला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने भारताला अत्यंत सहजपणे विजय मिळवण्यासाठी मदत केली. या भारतीय सलामी फलंदाजाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात १०२.५० या सरासरीने २०५ धावा केल्या.
एकदिवसीय मालिका संपल्यावर भारत वेस्ट इंडिजसोबत पुन्हा एकदा ब्रायन लारा क्रिकेट एकेडमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे 29 जुलैपासून पाच सामन्यांच्या टी२०आय मधील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.