News

PBKS vs MI: क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सनी पराभव, फायनलमध्ये जागा नाही

By Mumbai Indians

आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सकडून पराभव झाला. टीमला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला.

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांशी लढतील.

PBKS vs MI सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआयने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स देऊन २०३ धावा केल्या.

याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सने १९ ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन २०७ धावा केल्या आणि अंतिम सामन्यात एंट्री केली.

पीबीकेएस विरूद्ध एमआय सामन्यात एमआयची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. परंतु आपल्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत वेगाने धावा केल्या. सूर्यकुमार आणि तिलक यांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु त्यांना अर्धशतक करता आले नाही.

तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माची विकेट पडल्याने एमआयला सुरुवातीलाच धक्का बसला. रोहित फक्त आठ धावा करून बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने तिलक वर्मासोबत खेळ सावरला आणि महत्त्वाच्या धावा केल्या.

परंतु सातव्याच ओव्हरमध्ये बेअरस्टो बाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. बेअरस्टोने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. त्याने २४ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३८ धावांचे योगदान दिले.

यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी वेगाने धावा केल्या. परंतु नंतर मुंबई इंडियन्सने दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.

सूर्यकुमार २६ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४४ धावा काढल्यानंतर १४ व्या षटकात बाद झाला. दुसरीकडे तिलक वर्माने १५ व्या ओव्हरमध्ये २९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या.

मग हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांनी खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण हार्दिक १८ व्या षटकात १३ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला. नमनने १८ चेंडूत सात चौकारांसह ३७ धावा केल्या. राज बावा नाबाद राहिला आणि त्याने आठ धावा केल्या.

अशा रितीने मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ससमोर २० ओव्हर्समध्ये २०४ धावांचे लक्ष्य ठेवले.

पंजाबची टीम २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. परंतु त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने प्रभासिमरन सिंगला सहा धावांवर बाद केले.

सलामी फलंदाज प्रियांश आर्याने जोश इंग्लिससोबत डाव सावरला.

पंजाबला सहाव्या षटकात दुसरा धक्का अश्विनी कुमारने प्रियांशला बाद करून दिला. प्रियांशने १० चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार मारत २० धावा केल्या. इंग्लिसने २१ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली.

यानंतर श्रेयस आणि नेहल वढेरा यांनी खेळ सावरून डाव पुढे नेला. वढेराने उत्तम कामगिरी करत चार चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या.

दुसरीकडे कर्णधार अय्यरने आपल्या अप्रतिम अर्धशतकी खेळाच्या मदतीने टीमला विजय मिळवून दिला आणि त्यांची टीम फायनलमध्ये पोहोचली. त्याने पाच चौकार आणि आठ षट्कारांच्या मदतीने ४१ चेंडूंमध्ये ८७* धावा केल्या.

अशा रितीने पंजाबने १९ ओव्हर्समध्ये पाच विकेट्स देऊन २०७ धावा केल्या आणि विजय मिळवला.

मुंबईकडून अश्विनी कुमारने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

थोडक्यात धावसंख्या:

मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सकडून पाच विकेट्सनी पराभव

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २०३/६; सूर्यकुमार यादव ४४ (२६), अजमतुल्लाह उमरजई २/४३

पंजाब किंग्स: १९ ओव्हर्समध्ये २०७/५; श्रेयस अय्यर ८७* (४१), अश्विनी कुमार २/५५