
ENGvIND, पाचवी कसोटी: भारत कधीही हार मानत नाही - जबरदस्त कमबॅक!!
भारताने ओव्हलमध्ये सर्वांना डोळे फाडून बघायला लावणारा कमबॅक करून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. अलीकडच्या काळातील लाल चेंडूने केलेला हा एक जबरदस्त कमबॅक ठरला.
जो रूट आणि हॅरी ब्रूकच्या १९५ धावांच्या भागीदारीने आपला सामना हातातून नेला असे दिसत असतानाच भारतीय जलदगती गोलंदाजांनी सुपडा साफ केला. 💪
मो. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी आपल्या धमाकेदार गोलंदाजीने सामना पालटवला. शेवटच्या दिवशी इंग्लंडचा संघ धडाधड कोसळला आणि या नाट्यमय खेळात त्यांना विजयासाठी ६ धावा कमी पडल्या.
हे कसोटी क्रिकेट आहे आणि इथे काहीही होऊ शकते. 🎬
लंडनमध्ये पाच अविस्मरणीय दिवसांमध्ये काय काय घडले ते पाहूया... 👇
दिवस पहिला | भारत सुरूवातीलाच अडखळला
ओव्हरकास्ट पहिल्या दिवशी टीम इंडियाला जलदगती गोलंदाजीसाठी उत्तम असलेल्या खेळपट्टीवर रातोरात २००+ धावा करताना घाम फुटला. एक दोन वेळा पाऊस आला. त्यामुळे फक्त ६४ ओव्हर्सच पूर्ण झाल्या.
करूण नायर या वेळी चमकला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यापासून पहिले अर्धशतक झळकवून ५२ धावांवर नाबाद राहिला. 👏
📝 स्टंप्स, दिवस १: भारत- २०४/६ (६४ ओव्हर्स)
दिवस दुसरा | जलदगती गोलंदाजांची धमाल
पहिल्या अर्ध्या तासातच भारताच्या शेपटाला फारशी वळवळण्याची संधी मिळाली नाही. सगळेच २२४/१० असे बाद झाले.
त्यानंतर इंग्लिश फलंदाज हल्ला करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरले होते. त्यांनी पहिली विकेट पडण्यापूर्वी १३ ओव्हरमध्ये ९२ धावा कुटल्या.
परंतु भारतीय गोलंदाजांनी धीर सोडला नाही. त्यांनी इंग्लंडला २४७ वर सर्वबाद केले. त्यामुळे त्यांना खूप कमी आघाडी मिळाली. प्रसिद्ध- सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेऊन इंग्लंडला रोखले! 👌
DSP wraps up the English Innings! 🚨#ENGvIND #MumbaiIndians pic.twitter.com/v5DU4ERSNq
— Mumbai Indians (@mipaltan) August 1, 2025
त्यानंतर शेवटच्या टप्प्यात प्रकाश कमी झाल्यामुळे खेळ आटोपता घ्यावा लागला. वायबीजेच्या ४९ चेंडूंमध्ये ५१* धावांमुळे तिसऱ्या दिवशी जरा गंमत होणार होती.
📝 स्टंप्स, दिवस २: भारत - ७५/२ (१८ ओव्हर्स) ५२ धावांची आघाडी
दिवस तिसरा | आकाश दीपने भर दिवसा तारे चमकवले आणि यशस्वीचे शतक
आदल्या दिवसाचा नाइट वॉचमन असलेल्या आकाश दीपने खूप मज्जा केली. त्याने कसोटीतले पहिले अर्धशतक पूर्ण करताना क्लासी स्ट्रोक्स मारले आणि भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंदीआनंद झाला. 🤩
66 priceless runs. Top class batting! 👏#ENGvIND #MumbaiIndians pic.twitter.com/tenf01Ts7d
— Mumbai Indians (@mipaltan) August 2, 2025
त्यानंतर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरूद्ध आणखी एक शतक केले (११८) आणि सामना भारताच्या दिशेने वळला. जड्डू- वशी हे चौथ्या कसोटीचे रक्षणकर्ता होते. त्यांनी प्रत्येकी ५३ धावा करून टीमची आघाडी ३७३ धावांवर नेली.
या सामन्यात सुरूवातीला भरपूर विकेट्स घेणाऱ्या सिराजने त्या दिवसाच्या पेनल्टीटाइम चेंडूवर झॅक क्राऊलीची विकेट घेतली! 🎯
📝 स्टंप्स, दिवस ३: इंग्लंड - ५०/१ (१३.५ ओव्हर्स) विजयासाठी ३२४ धावांची गरज
दिवस चौथा | इंग्लंड विजयाच्या वाटेवर
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघासाठी आजचा दिवस सकारात्मक होता. प्रसिद्ध कृष्णा आणि मो. सिराज यांनी जेवणापूर्वी बेन डकेट (५४) आणि ऑली पोप (२७) यांना बाद केले.
पण नंतर मात्र जो रूट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांनी कमान सांभाळली. त्यांनी सहजपणे शतके पूर्ण केली आणि आपल्या टीमला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या आणखी जवळ नेले.
…पण तिसऱ्या सत्रात आपल्या जलदगती गोलंदाजांनी धमाका केला. त्यांनी शेवटपर्यंत आपला विश्वास कायम ठेवला.
दिवस पाचवा | सिराज चा विजय असो
पाचव्या दिवसात परत! पुन्हा एकदा!! इतक्या कसोटी सामन्यांमध्ये पाचव्या वेळी! 🤯 एका मालिकेने तुम्हाला यापूर्वी कधी खिळवून ठेवले होते?
त्याने फक्त ३५ धावांमध्ये चार विकेट्स घेतल्या आणि एक रोमांचक विजय मिळवून दिला!
आपल्याला सामन्यात हवी असलेली प्रत्येक गोष्ट या दिवशी मिळाली. एक रोमांचक, रोलर कोस्टर सामना. एक फिनिश जी आपल्याला खिळवून ठेवेल. आणि विश्वासाची गोष्ट येते तेव्हा सिराज दादाच वादा निभावणार याची खात्री असते. 🔥
फक्त ३५ धावा आणि ४ विकेट असताना, सिराजने ओव्हलला उजळून टाकले. त्याच्या सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये सलग दोन स्ट्राइकमध्ये त्याने - स्मिथला ज्युरेलकडे झेलबाद केले आणि पाठोपाठ ओव्हरटनला एलबीडब्ल्यू आउट केले. त्यामुळे भारताच्या बाजूने निकाल लागला.
त्यानंतर आला प्रसिद्ध कृष्णा. त्याने जो टंगला बाद करण्यासाठी १४१ किमीचा घोटा फोडणारा यॉर्कर टाकला.
पण सामन्याचा शेवटचा क्षण आपल्या सिराजने सर्वांसाठी खास बनवला. एक शेवटचा यॉर्कर, एक शेवटची गर्जना आणि एक शेवटची विकेट. अशा रितीने या ऑल टाइम क्लासिकमध्ये भारताने ६ धावांनी विजय मिळवला.
कसोटी क्रिकेटच्या आम्ही प्रेमात आहोत ते यासाठीच. 💙
**********
थोडक्यात धावसंख्या: भारत २२४/१० (करूण नायर ५७, गुस अटकिन्सन ५/३३) आणि ३९६/१० (यशस्वी जैस्वाल ११८, जोश टंग ५/१२५) कडून इंग्लंडचा ६ धावांनी पराभव. २४७/१० (झॅक क्राऊली ६४, प्रसिद्ध कृष्णा ४/६२) आणि ३६७/१९ (हॅरी ब्रूक १११, मोहम्मद सिराज ५/१०४)