
भारत विरूद्ध आयर्लंड, पहिल्या टी२०आयचे पूर्वावलोकनः हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघ डब्लिनमध्ये दाखल
भारतीय क्रिकेट संघ आपल्या दोन सामन्यांच्या पहिल्या टी२०आय मालिकेत आयर्लंडचा सामना डब्लिन येथील मलाहिदे क्रिकेट क्लब मैदानात रविवार दिनांक २६ जून रोजी करणार आहे.
पाहुण्या संघाला या वेळी त्यांचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमरा यांची कमतरता जाणवणार आहे. ते सध्या एड्गबस्टन येथे १ ते ५ जुलै या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी लँकेशायरविरूद्ध टूर मॅचमध्ये खेळत आहेत.
भारताच्या नियमित टी२०आय कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचा माजी ऑल राऊंडर हार्दिक पंड्या प्रथमच मेन इन ब्लूचे नेतृत्व करणार आहे.
नॅशनल क्रिकेट एकेडमी (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नेमणूक आयर्लंड मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून केली गेली आहे. राहुल द्रविड इंग्लंडमध्ये भारतीय कसोटी संघाला प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.
मुंबई इंडियन्सचे स्टार सूर्यकुमार यादव आणि विकेट कीपर फलंदाज संजू सॅम्सन यांनी भारतीय टी२०आय संघात पुनरामगन केले आहे. सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज राहुल त्रिपाठी यालाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाची संधी मिळाली आहे.
दरम्यान आयर्लंडने कर्णधार अँड्रयू बालबिर्नी याच्या नेतृत्वाखालील १४ खेळाडूंच्या टी२०आय संघाची घोषणा केली आहे.
भारताने टी२०आय स्वरूपात आयर्लंडवर आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. आयर्लंडने २०१८ मध्ये शेवटचे आमंत्रित केले होते. त्या वेळी पाहुण्या संघाने दोन्ही टी २०आय सामने अनुक्रमे १४३ आणि ७६ धावांनी जिंकले होते.
भारत आणि आयर्लंडदरम्यान पहिल्या टी२०आय सामन्यापूर्वी या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे:
हार्दिक पंड्या भारतीय कर्णधार म्हणून प्रथमच धुरा सांभाळणार
हार्दिक पंड्याने आपले नवीन फ्रँचायजी गुजरात टायटन्सना आयपीएल २०२२ च्या पहिल्याच सीझनमध्ये जिंकण्यासाठी नेतृत्व करून आपल्या कामाद्वारे सर्वांवर प्रभाव टाकला. हार्दिकने या सीझनमध्ये गुजरातचे १५ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यातील ११ सामने जिंकले आणि ४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्याची विजयाची टक्केवारी आतापर्यंत ७३.३३ आहे. त्याशिवाय हार्दिकने अलीकडेच संपलेल्या आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा पटकावणारा खेळाडू ठरून मोठी कामगिरी केली आहे. या धडाकेबाज ऑल राऊंडरने ४४.२७ च्या सरासरीने १५ सामन्यांत ४८७ धावा काढल्या आणि १३१.२६ चा स्ट्राइक रेट ठेवला. त्याने ७.२७ च्या इकॉनॉमीने आठ विकेट्स घेतल्या. रविवारी कर्णधार पद भूषवत असताना हार्दिकला भारताला विजय मिळवून देण्याची आशा असेल.
सूर्यकुमार यादव आणि संजू सॅम्सन भारताच्या ११ खेळाडूंच्या संघात खेळणार
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर भारताच्या खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये परतेल अशी अपेक्षा आहे. या ३१ वर्षीय खेळाडूला ६ मे रोजी मुंबई इंडियन्सच्या गुजरात टायटन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाली होती. सूर्यकुमार हा मागील वर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात प्रवेळ केल्यापासून भारताच्या टी२०आय मध्ये सातत्यपूर्ण खेळाडू ठरला आहे. या उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाने १६५.५७ च्या स्ट्राइक रेटने १४ सामन्यांत ३५१ धावा काढल्या आणि ३९ ची सरासरी ठेवली.
संजू सॅम्सन हा देखील नियमित विकेट कीपर गोलंदाज ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत टीममध्ये येणे अपेक्षित आहे. या सीझनमध्ये आयपीएल खेळताना त्याने केलेल्या अफाट कामगिरीमुळे त्याचा समावेश टी२०आय संघात केला गेला आहे. सॅम्सनने राजस्थान रॉयल्ससाठी १७ सामन्यांमध्ये १४६.७९ च्या स्ट्राइक रेटने ४५८ धावा काढल्या.
उमरान आणि अर्शदीप पहिल्या टी२०आयच्या प्रतीक्षेत
भारताने अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत आपला ११ खेळाडूंचा संघ कायम ठेवला असून व्हीहीएस लक्ष्मण आणि भारतीय टीम व्यवस्थापनाला आयर्लंडविरूद्ध दोन टी२०आयमध्ये उमरान मलिक आणि अर्शदीप सिगं यांना संधी द्यावीशी वाटते आहे. उमरान आणि अर्शदीप या दोघांनीही आयपीएल २०२२ मध्ये सिलेक्टर्सवर प्रभाव टाकला होता. सनरायझर्स हैदराबादच्या जलदगती गोलंदात उमरान मलिक याने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत तर डावखुरा जलदगती गोलंदात अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ससाठी १४ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या.