News

MIvRCB एलिमिनेटर रिपोर्टः फार फार दुःख झालंय! शेवटच्या चेंडूवरच्या पराभवाने डब्ल्यूपीएल चषकाचं स्वप्न भंगलं

By Mumbai Indians

वाईट वाटतंय. खूप वाईट वाटतंय. सामना आपल्या हातात होता. आपली कर्णधार छान खेळत होती. ती आणखी एक सुंदर कामगिरी करण्यासाठी तयार होती. १८ चेंडूंमध्ये २० धावा हव्या होत्या. आमच्या मनात आणखी एका मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या फायनलचं स्वप्न होतं. पण दुर्दैवाने संपलंय सगळं.

शेवटी झालेली गडबड

हरमनप्रीत २६ चेंडूंमध्ये ३१ धावांवर तर अमेलिया केर १९ चेंडूंमध्ये २१ धावांवर खेळत होती. आपल्याला १८ चेंडूंमध्ये २० धावा हव्या होत्या. पण त्यानंतर काय झालं पाहा: 0 1 1 1 1 W | 1 0 1 1 W 1 | 1 1 2 W 1 1. अठराव्या ओव्हरमध्ये चार धावा मिळाल्या, एकोणीसाव्या ओव्हरमध्ये चार आणि विसाव्या ओव्हरमध्ये सहा धावा आल्या. हरमन खेळायला आली, तिचा अंदाज चुकला आणि शेवटी डीप फिल्डरकडे चेंडू सोपवून दिला. एस सजना आणि पूजा वस्त्रकार यांची कमाल चालली नाही आणि दुर्दैवाने अमेलिया केर दुसऱ्या बाजूला अडकून पडली. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. आपल्या केरला आशा शोभनाच्या मोठ्या लेग स्पिनरचा अंदाज लागला नाही. त्यामुळे ब्लू आणि गोल्डच्या आशा धुळीस मिळाल्या.

कप्तान कौरचा नांगर

मागच्या वर्षीच्या दिल्लीविरूद्ध झालेल्या फायनलसारख्याच पाठलागात हरमन सज्ज दिसत होती. तिने ३० चेंडूंमध्ये चार धावा केल्या. त्यामुळे पाठलागावरही तिचं चांगलंच नियंत्रण होतं. आपल्या ओपनर्सची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. नॅट स्किव्हर ब्रंटने इनिंगला चांगली सुरूवात केली. त्यानंतर केर- कौर यांनी विजयाच्या खूप जवळ पोहोचवलं. पण तेवढं पुरेसं ठरलं नाही.

हायली, नॅटची ४-०-१८-२ कामगिरी

आरसीबीचे दोन्ही सलामी फलंदाज सुरूवातीपासूनच फटकेबाजी करत होते. पण हायली आणि नॅट यांनी आपल्या ऑफ स्पिन आणि मध्यमगती गोलंदाजीने एमआयला पुन्हा वर्चस्व मिळवायला मदत केली. त्यांनी चार विकेट्स घेऊन आरसीबीला १५ ओव्हर्समध्ये ८४/५ वर आणून ठेवलं.

पण पुन्हा एकदा, पेरी आडवी आली

मागच्या सामन्यात तिने जी कामगिरी केली ती तिने विसरली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. त्या सामन्यात सहा विकेट्स आणि पाठलागात उत्तम फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी बनवलं होतं. तिला थांबायचं नव्हतंच. विकेट्स पडत असतानाही ती थांबून राहिली आणि तिने ५० चेंडूंध्ये ६६ धावा करून आपल्या संघाला १३५ पर्यंत पोहोचवलं. त्यानंतर तिने धोकादायक ठरू शकणाऱ्या यस्तिका भाटियालाही घरी पाठवलं.

पलटन, आम्हाला माहित्ये की तुम्हाला दुःख झालंय. पण आम्हाला आमच्या मुलींचा अभिमान आहे. मागच्या तीन आठवड्यांमध्ये त्यांनी आपल्याला आनंद वाटावा असे अनेक क्षण दिले आहेत आणि आज वातावरण दुःखी असलं तरी ही टीम आमचा अभिमान आहे.

थोडक्यात धावसंख्या: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १३५ /६ (२० ओव्हर्स) (एलिस पेरी ६६, जॉर्जिया वेरहॅम १८; हायली मॅथ्यूस २/१८) कडून मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव १३०/६ (२० ओव्हर्स) (हरमनप्रीत कौर ३३, अमेलिया केर २७; श्रेयंका पाटील २/१६).