News

“खरा तिलक वर्मा आशिया कप फायनलमध्ये दिसला”: सूर्यकुमार यादव

By Mumbai Indians

तिलक वर्मा फक्त २२ वर्षांचा आहे. परंतु त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट करियरसाठी अशा इनिंग खेळल्या त्या त्याच्या आयुष्यभर लक्षात ठेवल्या जातील. तो १०/२ वर खेळायला आला आणि लवकरच २०/३ झाले. भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध खेळत होता. आशिया कप अंतिम सामना होता. परिस्थिती गंभीर होती.  

पण कर्णधार सूर्यकुमार वर्माला टेन्शन यायचं काही कारणच नव्हतं.

“आम्ही दक्षिण आफ्रिकेत होतो तेव्हा त्याने टी२०आयमध्ये दोनशे धावा केल्या. आम्हाला तेव्हाच कळलं होतं की तिलक वर्माचा उदय झालेला आहे. पण खरा तिलक वर्मा आशिया कपच्या अंतिम सामन्यात दिसला,” असं त्याने विमल कुमारसोबतच्या चॅटमध्ये सांगितलं.

६९ धावा | ५३ चेंडू | ३ चौकार | ४ षट्कार

टीव्ही अत्यंत आनंदाने मैदान गाजवायला तयार झाला. तो अत्यंत आनंदाने फटके मारत होता. तो प्रतीक्षेचा खेळ खेळायला तयार होता. तो तयार होता.

“तुमच्या लक्षात आलं असेल की रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट हे त्याचे आवडते शॉट्स आहेत. इतके की तो त्यांना खेळल्याशिवाय राहूच शकत नाही. परंतु अंतिम सामन्यात त्याने असा एकही शॉट मारला नाही,” स्काय म्हणाला.

“मी ज्या शिस्तीबद्दल बोलतो ती हीच आहे. इतक्या लहान वयात ती कमावणं हे कौतुकास्पद आहे. त्याने ज्या पद्धतीने पाठलाग नियंत्रित केला, कधी जास्त धावा आणि कमी चेंडू असायचे, पण त्याने ते साध्य केले. पहिल्या ड्रिंक्स ब्रेक रम्यान, गौती भाई (गंभीर) आत गेले आणि त्याला शेवटपर्यंत खेळायला आणि सामना जिंकायला सांगितलं. त्याने नेमकं तेच केलं. हे सांगणं सोपं आहे पण करणं कठीण. खेळ कसा चालला आहे, परिस्थिती काय आहे हे फक्त खेळणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतं. अशा परिस्थितीत शांत आणि शांत राहणं अविश्वसनीय आहे.”

हे रक्तात असावं लागतं. ब्लू अँड गोल्डमध्ये हे आहे. याच काही क्षणांसाठी आपल्या मुलांनी सराव केलाय. तो २०२२ मध्ये १८ वर्षांचा खेळाडू म्हणून मुंबईसाठी खेळायला उतरला. तो तेव्हा अंडर १९ वर्ल्ड कप खेळून आला होता. त्याने पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो त्यातून तावून सुलाखून सोन्यासारखा झळाळत आलाय! 

“आम्ही सगळेच, (जसप्रीत) बुमराह, तिलक, रोहित (शर्मा), हार्दिक (पांड्या) आम्ही भारतासाठी खेळण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी खेळलोय. हे गुरूकुल आहे. ही एक संस्था आहे. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन,” सूर्या म्हणाला.

“या गुरुकुलात ते खेळाडू घडवतात. त्या कुटुंबात प्रत्येकजण विद्यार्थी म्हणून येतो. ते येतात, अभ्यास करतात, सराव करतात, परीक्षा देतात (सामने खेळतात). आम्ही फलंदाजी करतो, भारतासाठी खेळतो तेव्हा आम्ही याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा तो भारतासाठी खेळला तेव्हा तयार होता. त्याने यापूर्वीही असे खेळ खेळले होते. त्याला काय करायचे आहे हे माहित होते.”

तू आमचा अभिमान आहेस टीव्ही. तुला खूप खूप शुभेच्छा.