
इंग्लंड विरूद्ध भारतः रोहितच्या मेन इन ब्लूची तीन सामन्यांची टी२०आय मालिका
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांचा टप्पा गुरूवार ७ जुलै रोजी सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेतील पहिला सामना उद्या खेळला जाईल.
पुनर्नियोजित पाचव्या कसोटी सामन्याचा उत्कंठावर्धक समारोप झाला. भारताचा या सामन्यात सात विकेट्सनी पराभव झाला. परंतु आता पाहुणा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या टी२०आय स्वरूपावर लक्ष केंद्रित करणार आहे.
भारतीय टीमच्या मागील टी२०आय मालिकेत त्यांनी आयर्लंडविरूद्ध २-० ने मालिका जिंकली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोविड-१९ ग्रस्त झाल्यामुळे त्याला एजबस्टन कसोटी मालिकेत खेळता आले नाही. तो आता आगामी सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
ही तीन सामन्यांची टी२०आय मालिका ऑक्टोबरमध्ये २०२२ आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपसाठी तीनच महिने उरल्याने खूप महत्त्वाची ठरेल.
मालिकेपूर्वी या काही महत्त्वाच्या बाबींची चर्चा सुरू आहे.
२०२२ मध्ये टी२०आयमध्ये भारताचे वर्चस्व
भारताने या कॅलेंडर वर्षात एकूण १३ टी२०आय सामने खेळले आहेत. त्यांनी या प्रक्रियेत १० विजय नोंदवले आहेत. त्यांना फक्त दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला. त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ वरून २-२ वर आले आणि मालिका बरोबरीत सोडवली.
त्याचवेळी इंग्लंडने २०२२ मधील पाच टी२०आय सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांत विजय नोंदवले आहेत.
दोन्ही देशांमधील सामन्यांच्या विजयाची बरोबरी
इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांनी सध्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समान कामगिरी केली आहे. या दोन्ही टीम्सनी १६ सामन्यांत आठ विजय प्राप्त केले आहेत.
अर्थात भारत २०२२ मध्ये टी२०आय सामन्यांमध्ये आत्मविश्वासाने उतरला आहे. या संघाने इंग्लंडविरूद्ध टी२०आय मध्ये मागील तीन मालिका जिंकल्या आहेत.
या खेळाडूंवर असेल लक्ष
आगामी तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत कर्णधार रोहित शर्माबरोबरच दीपक हूडा आणि उमरान मलिक यांच्यावरही लक्ष दिले जाईल.
हूडा हा आयर्लंडमधील मालिकेत खेळला असून त्याने १७५.५८ च्या स्ट्राइक रेटने १५१ धावा केल्या. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे खेळाडू पिह्लाय टी२०आय मालिकेत खेळण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे या २७ वर्षीय खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली.
उमरान मलिक हा जसप्रीत बुमराच्या जागी टी२०आयमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. या २२ वर्षीय जलदगती गोलंदाजाने आयर्लंडविरूद्ध दुसऱ्या टी२०आय सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदार्पण केले. त्याने डर्बीशायरविरूद्ध वॉर्म अप सामन्यात २/३१ अशी कामगिरी केली आणि आता तो शक्तिशाली इंग्लिश फलंदाजांसमोर आपल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करेल.
पहिला इंग्लंड विरूद्ध भारत टी२०आय सामना गुरूवार दिनांक ७ जुलै रोजी रोझ बाऊल क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. सामना रात्री १०.३० वाजता सुरू होईल.