News

“माझ्या मते हे वर्ष मागील वर्षी कोसळल्यानंतर उभे राहण्याचे आहे”: मार्क बाऊचर

By Mumbai Indians

२०२२ हे वर्ष संपत आले असताना आता रिसेट बटण दाबण्याची वेळ झाली आहे. आपले नवीन मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आपल्याला विजयाच्या दिशेने पुन्हा नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते दक्षिण आफ्रिकेच्या टीमसोबत यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासाठी तयार आहेत. सध्या ते मुंबईत असून त्यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सारांश .. 

आयपीएल २०२२ चा सीझन कसा होता त्याबद्दल 

खरे म्हणजे मागील वर्षी आपण अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली नाही असे मला वाटते. अर्थात आपण त्याबद्दल चर्चा केली आहे. कधीकधी तुम्हाला विजयी होण्याची संधी मिळत नाही. आपण कठीण परिस्थितीतून जात असतो. परंतु आपल्याला मिळालेला धडा महत्त्वाचा असतो असे मला वाटते. आपण या शिकलेल्या धड्यांबद्दल चर्चा केली आहे आणि ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. 

आपण कोसळू शकतो, हरू शकतो पण आपल्याला पुन्हा उठावेच लागते आणि माझ्यासाठी हे वर्ष पुन्हा उठून उभे राहण्याचे आहे. आता हार मानायची नाही. अनेक लोकांना मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना पाहायचे आहे आणि यालाच आम्ही सर्वाधिक प्राधान्य देणार आहोत. आम्हाला आमची कामगिरी चांगली करावी लागेल. आम्हाला आमच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करावा लागेल आणि आम्ही ते नक्की करू. त्याचबरोबर स्वतःसाठी उभे राहून आम्हाला पुन्हा एकदा योग्य दिशेने जायचे आहे. एक प्रशिक्षक म्हणून सर्व खेळाडूंना याच टप्प्यावर आणण्याची माझी जबाबदारी आहे. परंतु, मी आधी म्हटले तसे स्पर्धेचा आनंद घेणे आणि समोर असलेल्या आव्हानांचाही आनंद घेणे महत्त्वाचे आहे. 

भारतासाठी एक प्रशिक्षक म्हणून त्यांच्या पहिल्या कामगिरीबाबत

खरे म्हणजे ही माझ्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होणे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. मी त्यासाठी खरोखर उत्सुक आहे. हे एक खूप मोठे आव्हान आहे. मी हे साध्य करण्यासाठी आतूर आहे. मी मुंबईत आलो त्या दिवशी मला भेटायला खूप गर्दी जमा झाली होती. त्यांचे प्रतिनिधित्व मी करणार आहे हा विचार मला खूप नर्व्हस करणारा होता. परंतु मी त्यासाठी खरोखर उत्सुक आहे. मला आशा आहे की या वेळी मी मुंबई इंडियन्सला विजय प्राप्त करून देऊ शकेन आणि थोडी गंमतजंमतही होईल. कारण हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मला या संधीचा आनंद घ्यायचा आहे. आमच्या खेळाडूंमधले सर्वोत्तम जगापुढे आणता येईल अशीही मला आशा वाटते.   

वानखेडेवर खेळण्याबाबत 

सर्व आयपीएल टीम्ससाठी घरच्या खेळपट्टीवर खेळण्याचे फायदे नक्कीच असणार आहेत. मी इथे खूप काही खेळलेलो नाही. मी इथे फक्त एखाददुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळलो आहे. परंतु मुंबई इंडियन्सची टीम आणि माझ्या सपोर्ट स्टाफशी चर्चा केल्यानंतर इथे खेळण्याचा मोठा फायदा होतो असे माझे मत झाले आहे. अर्थात हे इथल्या खेळपट्टीमुळे नाही तर माझ्या मते इथे चाहतेही खूप आहेत. आम्ही चांगले खेळत असताना मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा आमचा उत्साह वाढवणारा ठरेल आणि आमच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार होमटाऊनचा लाभही आम्हाला मिळेल. आम्ही चाहत्यांकडून पाठिंब्यासाठी खूप आतूर आहोत. क्रिकेटमध्ये आम्हाला भव्यदिव्य कामगिरीही करता येईल असेही मला वाटते. तर घरच्या खेळपट्टीवर खेळण्याचा लाभ नक्कीच मिळेल. 

मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग आमच्यासोबत आहे ही खूप खास गोष्ट आहे आमच्यासाठी.